पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहूत मंगळवारी संत तुकाराम महाराजांच्या शीळा मंदिराचा जीर्णोद्धार झाला. मोदींनी या प्रसंगी वारकरी संप्रदायाला नमन करीत विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
भाषणाची सुरूवात मोदींनी श्री विठ्ठलाय नम, नमो सद्गुरु तुक्या ज्ञानदिपा.. नमो भास्करा ज्ञानमूर्ती. असे म्हणत केली. त्यानंतर त्यांनी अनेक अभंग सादर करीत उपस्थित वारक-यांना नमन केले.
पालखी मार्गाचा विकास
काही दिवसांपूर्वी पालखी मार्ग चार पदरी करण्याचे लोकार्पण करण्याचा मान मिळाला. तीन चरणात काम पूर्ण होईल. ३५० किमी पेक्षा जास्त अंतराचे हायवे होतील. ११ हजार कोटींपेक्षा जास्त खर्च करणार आहोत. तीन टप्प्यांमध्ये पालखी मार्गाचे काम पूर्ण केले जाईल, असे मोदींनी सुरूवातीला सांगितले.
ज्या शिळेवर तुकाराम महाराजांनी १३ दिवस तपश्चर्या केली असेल, ती शीळा फक्त शीळा नव्हे ती भक्ती आणि ज्ञानाची आधारभूत शीळा आहे. या क्षेत्राच पुननिर्माण करण्यासाठी आभार व्यक्त करतो. संताजी जगनाडे महाराज यांनाही नमन करतो. आपण देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. जगातील प्राचीन सभ्यता लाभलेल्या देशांपैकी भारत एक आहे. याचे श्रेय संत आणि ऋषिंना जाते. भारत शाश्वत आहे कारण संतांची भूमी आहे, असेही मोदी म्हणाले.







