वाढती स्पर्धा, धकाधकीचे जीवन अशा काळात करिअर करताना अधिक समंजसपणे काम करणे गरजेचे आहे. कंपनीची संस्कृती व कर्मचा-यांमध्ये एकसंघ वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व कर्मचा-यांनी एकत्र येणे, सकारात्मक विचारांची देवाणघेवाण करणे, मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करणे गरजेचे असते. असे झाले तरच कंपनीचा विकास साधता येतो, अशी आग्रही भूमिका घेणारे महापारेषण कंपनीच्या मानव संसाधन विभागाचे संचालक मा. सुगत गमरे यांनी उत्तम माणूस म्हणून कसं घडता येईल, अध्यात्मातून स्वतःची प्रगती कशी साधता येईल, ताल-सूर-लयीचा व्यक्तिगत आयुष्यात कसा वापर करता येईल, अशा अनेक बाबींवर चिंतन केले आहे. त्यांचं मार्गदर्शन नव्या पिढीसाठी, नव्या एचआर व्यवस्थापकांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.

सध्याच्या कौशल्य विकासाच्या जगात नव्याने एमबीए होऊन बाहेर पडलेल्यांसाठी या मुलाखतीतील मुद्दे प्रेरणादायी ठरणारे आहेत.
-उत्तम करिअर कसं करावं?
-इतरांना आपलंसं कसं करावं?
-अधिका-यानं मित्रासारखं वागावं का?
-फिटनेस कसा टिकवावा?
-चांगले छंद का असावेत?
-उत्तम माणूस कसा व्हावे?
यांसारख्या अनेक प्रश्नांची सोप्या शब्दांत उत्तरं देणारी ‘अत्त दीप भव’ हे भारतीय तत्त्वज्ञान अधोरेखित करणारी ही मुलाखत ऐकायला हवी.







