नवी दिल्ली : जालियनवाला बागेत १९१९ मधे आजच्या दिवशी हुतात्मा झालेल्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. गेल्या वर्षी जालियनवाला बाग स्मारकाच्या नुतनीकरण केलेल्या संकुलाच्या उदघाटनावेळी केलेले आपले भाषणही पंतप्रधानांनी शेअर केले आहे. आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले; “जालियनवाला बागेत १९१९ मधे आजच्या दिवशी हुतात्मा झालेल्यांना आदरांजली. त्यांचे अतुलनीय धैर्य आणि त्याग येणा-या पिढ्यांना प्रेरणा देत राहील.







