त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर येथे उटी वारीच्या पार्श्वभूमीवर निवृत्तीनाथांच्या जीवन समाधीवर सुवासिक थंडगार चंदनाचा लेप चढवण्यात आला. चैत्र वैद्य एकादशी उटीची वारी संपन्न झाली. या उत्सवानिमित्त राज्यभरातून भाविकांच्या दिंड्या त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाल्या आहेत. दरम्यान, मंदिराला सोन्याचा कळसही चढवला जाणार असून मे महिन्यात त्याचा सोहळा होणार आहे.

चैत्र महिन्यात प्रखर उष्णता असते. त्यामुळे शीतलता लाभावी यासाठी संत श्रेष्ठ श्री निवृत्तीरायांना चंदनाची उटी लावण्याची परंपरा शंभर वर्षांपेक्षाही अधिक काळापासून आहे आणि यास उटीची वारी असे म्हणतात.वारीसाठी राज्यभरातून भाविकांच्या दिंड्या त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत असतात. मंदिरात सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहामध्ये भजन कीर्तनाला सुरुवात झाली.








