पुणे – `समर्थव्रती.. सुनील चिंचोलकर..`या दिलीप महाजन व डॉ.अपर्णा चिंचोलकर गोस्वामी लिखित व मोरया प्रकाशन प्रकाशित प्रेरणादायी चरित्र ग्रंथाचे प्रकाशन काल पुण्यातील भरत नाट्य मंदिर येथे स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज, स्वामी श्रीकांतानंदजी महाराज व प्रवचनकार कल्याणी नामजोशी यांच्या हस्ते झाले.
श्री. महाजन यांनी प्रकाशक व लेखक अशा दुहेरी भूमिकेतील आपल्या पहिल्याच पुस्तकामागची संकल्पना विशद केली तर डॉ. अपर्णा यांनी आपल्या पित्याचा जीवनपट उलगडतानाची भूमिका स्पष्ट केली.

नामजोशी यांनी सुनीलजींच्या कार्याचे विशेषत्व सांगताना त्यांना सर्वतोपरी साथ देणाऱ्या सहधर्मचारिणीचे, सुनीता चिंचोलकर यांचेही चरित्र प्रसिद्ध होण्याची आवश्यकता व्यक्त केली.
स्वामी श्रीकांतानंद यांनी सुनीलजींच्या कार्याचा गौरव करीत येणा-या काळात त्यांच्या कार्याची अधिक आवश्यकता असल्याचे नमूद करीत हे चरित्र अनेकांना प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला..
स्वामी गोविन्ददेव गिरिजी महाराज या प्रसंगी बोलताना म्हणाले की ” इतर संतांनी हिन्दू समाज सहिष्णु केला तर समर्थांनी तो जयेष्णु केला” आणि येणा-या काळात आपल्या धर्मावर व संस्कृतीवर होणारी आक्रमणे थोपविण्यासाठी समर्थांच्या समर्थ विचारांची नितांत आवश्यकता आहे… देशभक्त सुनीलजींनी जीवनभर समर्थ विचारांच्या प्रसार प्रचाराचे काम केले म्हणूनच ते समर्थव्रती बनले…
सुनीलजींच्या या प्रेरणादायी चरित्राची आता नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले…
मोरया प्रकाशनाच्या गौरी देव यांनी सूत्रसंचालन केले तर, योगिनी आठल्ये यांनी स्टेजची व्यवस्था सांभाळली…
डॉ. राम साठे, संभाजीनगर चे श्री अनंत भागवत तसेच या चरित्र ग्रंथाच्या सल्लागार समितीमधील सर्वांचे सहकार्य लाभले. संपूर्ण वंदेमातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.
या सोहळ्याची क्षणचित्रे खालील लिंकवर पाहता येतील.







